Type Here to Get Search Results !

रुग्णवाहिका न मिळाल्याने भिक्षुकी करणाऱ्या वाकोदच्या तरुणाचा मृत्यू पहूर ग्रामीण रुग्णालयातच सोडले प्राण ! गोरगरिबांचा कोणी आहे का वाली ?



 प्रतिनिधी-पहूर ता जामनेर.

दिशा लाईव्ह न्यूज --::--   चक्कर येऊन पडल्याने अत्यवस्थ झालेल्या वाकोद येथील  तरुणाला पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले .मात्र पुढील उपचारासाठी जळगावला  हलविण्यासाठी तब्बल अर्धा तास  होऊन गेल्यावरही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पहूर येथे मंगळवारी ( ता .७ ) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली .

    याबाबत अधिक माहिती अशी की , सुनील साकरू जोशी रा . वाकोद हा तरुण वाकोद येथे चक्कर येऊन पडल्याने त्यास नातेवाईकांनी पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . पहूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्याचे सांगितले . मात्र अर्धा तास पेक्षा अधिक वेळ होऊनही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अखेर ग्रामीण रुग्णालयातच तरुणाने प्राण सोडले .


मयत सुनील जोशी हे वाकोद येथे राहत होते . भिक्षुकी करून आपली उपजीविका भागविणाऱ्या सुनील जोशी यांच्या पश्चात दोन मुले पत्नी आई वडील असा परिवार आहे आहे . 


पहूर ग्रामीण रुग्णालयात दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी संताप्त नागरिकांनी व नातेवाईकांनी केली आहे .


            तर वाचले असते प्राण -


रुग्णवाहिका वेळेत आली असती तर निरपराध तरुणाचे प्राण वाचले असते असे सांगून मयताचे नातेवाईक सुशिल जोशी , गोविंदा जोशी, कृष्णा जोशी  गोरगरिबांचे कोणी आहे का वाली ? असा संतप्त सवाल केला आहे .

Post a Comment

0 Comments