कृष्णा पाटील-तोरणाळा.
दिशा लाईव्ह न्यूज -:- रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पिढ्यान पिढ्या शेतरस्त्यासाठी चाललेला संघर्ष थांबावा ,यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभर मोठा शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत असून जिल्हा तहसील कार्यालयात शेतरस्त्या संबंधात गांभीर्य निर्माण करत गावोगावचे शेतकरी चळवळीत सहभागी होत असून या आंदोलनाला न्यायालयीन प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय कार्यालयाकडून शेतकऱ्यांची शेतरस्त्यांसाठी होणारी हेळसांड थांबवण्यासाठी विविध सामाजिक संघटनाअन्नदात्याच्या पाठीशी उभे राहत आहेत.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नियोजित बैठकीत राजव्यापी आंदोलनाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी रावेर शिव पानंद शेतरस्ता कृती समितीची स्थापना करण्यात आली.
त्यानंतर रावेर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी प्रशासनाला शेतरस्त्या संबंधित विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करत विशेष परिपत्रक काढत गावोगावी ग्राम शेतरस्ता समित्या स्थापन करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देणार असून शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना संबंधित विभागांना देण्यात येतील .
शेतकऱ्यांनी तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर राखत शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी निवासी तहसीलदारांचा सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या .
यावेळी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरदभाऊ पवळे,राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्याकडून चळवळीच्या वतीने धन्यवाद व्यक्त करण्यात आले.
यावेळी रावेर तालुका शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे सचिन चौधरी, सुमित पाटील, सुनील कोंडे, राहूल चौधरी, राकेश सपकाळे, सुरेश भंगाळे शुभम पाटील ,नीलकंठ पाटील, संजय वाणी, कमलाकर भंगाळे ,संजय महाजन, प्रतीक पाटील ,सागर पाटील ,हर्षल महाजन मोहन चौधरी, योगेश कोंडे ,,अरुण मेढे ,रोशन खाचणे, जग्गनाथ मेढे प्रशांत काठोके ,योगेश पाटील ,प्रमोद चौधरी, अक्षय महाले, आनंदा चौधरी, मधुकर तायडे ,युवराज पाटील आदी शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे व राज्य समन्वयक श्री दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य चळवळीच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले.जनजागृती जनआंदोलन न्यायालयीन लढयाला बळ देणाऱ्या शेतकऱ्यांच्याव्यथा समजून घेत तहसिलदारांनी घेतलेल्या परिवर्तनवादी निर्णयाने तालुका सुजलाम सुफलाम होईल याचा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आदर्श घ्यावा - महाराष्ट्र राज्य चळवळीच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले असून यामुळे रस्त्याच्या अडचणीत असलेल्या अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे समजते.
Post a Comment
0 Comments