(चाळीसगाव तहसीलदार मा श्री प्रशांतजी पाटील यांचे कडे निवेदन सविनय सादर.निवेदन देताना संघटनेचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष श्री सुनिल नारायण चौधरी ,श्री सुभाष बोरसे,श्री प्रदिपजी, प्रदिप चौधरी.)
दिशा लाईव्ह न्यूज --::-- मराठा समाजाचे नेते आदरणीय श्री मनोज जोरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जे आंदोलन केले त्याची दखल मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेऊन मा.मंत्री महोदय विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वात मराठा नेते श्री मनोज जोरांगे पाटील यांना हैद्राबाद गैझेट नुसार मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीचे आरक्षणात समाविष्ट करण्याचा GR काढण्याचे आदेश देण्यात आले.
तो GR महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या मुलाबाळांच्या भविष्याचा तथा ओबीसी समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय इच्छाशक्ती असणाऱ्यांसाठी आत्मघातकी असल्यांसारखा आहे.सात ते आठ कोटी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात समाविष्ट केले तर 27% ओबीसी आरक्षण ते आताच्या परिस्थितीत ओबीसी समाजाला फक्त 17% मिळते त्यातही सरसकट मराठ्यांना कुणबी समाजाचे दाखले देऊन ओबीसीचे आरक्षण नगण्य होऊन जाईल.
ज्यामुळे ओबीसी प्रवर्गाची आर्थिक, सामाजिक ,शैक्षणिक विकास मंदावेल
.या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून शासनाने मराठा समाजाला कायद्यामध्ये सुधारणा करून10% स्वतंत्र आरक्षण द्यावे.जेणैकरून ओबीसी प्रवर्गाचे नुकसान होणार नाही.ओबीसी समाजाला न्याय मिळेल.अशी मागणी श्री संताजी अखिल तेली समाज संघटन चाळीसगाव जि.जळगांव जिल्हा च्या वतीने करण्यात आली आहे.
सरकारने निवेदनाला सकारात्मक घेऊन योग्य तो मार्ग काढुन न्याय द्यावा.निवेदन पुढील कार्यवाईस पाठवितो असे आश्वासन मा. तहसिलदार साहेब यांनी संघटनेला दिले.
https://youtube.com/shorts/6msD1EPuT2M?si=eq7pK7eDaoQpfwJ3
*दिशा लाईव्ह न्यूज*
ब्लू लिंकला क्लीक करून व्हिडीओ ओपन करा.

Post a Comment
0 Comments